*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे स्वच्छता हीच सेवा -२०२५ मोहीमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा…!* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये व्याख्यान सत्र व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभागीय समन्वयक, जळगाव प्रा. डॉ. दिनेश पाटील, संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक, व भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा. प्राचार्य…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
गाव तेथे बौद्धविहार देणार मुकुंद नन्नवरे यांची माहिती, आमोदा बु. येथे शिवसेना मागासवर्गीय बैठकीत पाळधी | प्रतिनिधी जळगाव तालुका शिवसेना शिंदे गट मागासवर्गीय सेनेची बैठक रविवारी आमोदा बु. बौद्धविहारात झाली. जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत मागासवर्गीयांच्या विविध समस्या व अन्य विषयावर चर्चा झाली. यावेळी जळगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून बौद्ध विहार उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव ननन्वरे यांनी सांगितले. तालुक्यात लवकरच घरकुल, रेशनकार्ड, गरजूंना धान्य, जातीचे दाखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरींचा लाभ मिळवून देणे यासह अन्य विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूं पर्यंत पोहचविण्यासाठी गटनिहाय शिबिर घेण्याचेही नियोजन यावेळी करण्यात…
*पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही *पाचोरा/जळगाव प्रतिनीधी दि.22 सप्टेंबर – पाचोरा शहर व परिसरातील, गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे,हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली, यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.* या पाहणी दरम्यान, पालकमंत्री यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष…
शारदीय नवरात्री घटस्थापना च्या शुभमुहूर्तावर पाळधी बु येथे आज आराध्य दैवत आई भवानी माता मंदिर परिसरात सुशोभीकरण अंतर्गत काँक्रीटीकरण चे भूमिपूजन झाले असून तसेच नवीन पाण्याची टाकी खंडेराव मंदिर परिसरात काँक्रीटीकरण , आरोग्य केंद्र येथे महादेव मंदिर भूमिपूजन असे विविध भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पार पडला असून या वेळी उपस्थित मध्ये मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, मा.सभापती मुकुंदराव नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, लोकनियुक्त सरपंच विजू बापू पाटील, सचिनदादा पवार, अनिल भैय्या कासट , मा.सरपंच अरुण पाटील, श्रीकृष्ण नाना साळुंखे , सुरेश तोताराम पाटील, सुरेश पाटील दोनगावकर, प्रशांत झंवर , आबा…
एसटी महामंडळात १७ हजार जागांवर भरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय, पगार मिळणार… ST Corporation Recruitment : एसटी महामंडळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. १७ हजार ४५० जागांसाठी एसटी महामंडळात भरती होणार आहे. मुंबई : एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून १७ हजार ४५० कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. एसटी महामंडळात रोजगाराची संधी एसटी महामंडळाच्या ३००व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे.…
दिवाळी नंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे यात नेते मंडळी कार्यकर्ते व हितचिंतक यांचा समावेश आहे पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात मागील पंचवार्षिक चे सदस्य प्रतापराव पाटील भरघोस मतांनी निवडून आल्याने पाळधी जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे मार्गी लागले मागील पंचवार्षिक ला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील जनतेसमोर नवखे होते पण गेल्या 5 ते 7 वर्षात जिल्हा परिषद गट च नव्हे तर पूर्ण जळगाव ग्रामीण मध्ये त्यांचा वाढता जनसंपर्क रात्री आहोरात्री कार्यकर्ते यांच्या साठी सुख दुःखात जाणे जनसंपर्क ठेवणे व आपल्या प्रेमळ स्वभावाने तरुणाईला भुरड घातली आहे गेल्या विधानसभेला…
*पाझर तलावामुळे सिंचन, मत्स्यव्यवसाय व ग्रामविकासाला मिळणार चालना – पालकमंत्री गुलाबराव पाटील* वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलाव जलपूजनाने भरला विकासाचा नवा विश्वास *जळगाव प्रतिनिधी दि. २० सप्टेंबर – पाझर तलावामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून उन्हाळ्यात देखील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिपादन केले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलावातील जलपूजन शनिवारी करण्यात आले.* *मागील वर्षी मंजूर निधी, यंदा शंभर टक्के भरला तलाव* मागील वर्षी या तलावाच्या दुरुस्तीकरिता मंत्री…
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्ली चे उद्घाटन !* जळगावकरांसाठी नवी खाऊ गल्ली -.नव्या स्वादाचा अनुभव *जळगाव प्रतिनिधी दि.20 सप्टेंबर – खाऊ गल्ली या उपक्रमातून नागरिकांना वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या हातच्या पारंपरिक, सुगरणींच्या चविष्ट पदार्थांची खाऊ गल्लीमध्ये खास चव चाखता येणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. 22 जुलै रोजी सुरू करण्यात आलेले बहिणाबाई मार्ट व खाऊ गल्ली ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल व त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.* जळगावकरांच्या चवीला नवा रंग आणि महिला बचत…
*एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन – सेवा पंधरवड्यात धरणगावात थेट लाभवाटप *धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. 19 सप्टेंबर – महिलांच्या हातातील ताकद म्हणजे कुटुंब व समाजाच्या विकासाची हमी आहे. म्हणूनच एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील १४ शिबिरांमधून आतापर्यंत ५,७०० पेक्षा जास्त नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे नमूद करत पालकमंत्री म्हणाले की, शासनाच्या निधीचा व योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे. गावोगावी जाऊन नागरिकांना योजनांची माहिती द्या. मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जनतेच्या डोळ्यातले समाधान हीच…