*मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील* मंत्रालयात वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी *मुंबई/जळगाव प्रतिनिधी, दि. ७ ऑक्टोबर : वाल्मीकी ऋषी हे समाजातील परिवर्तनाचे प्रतीक होते. त्यांनी रामायणाद्वारे मानवाला आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान दिले. त्यांनी दाखवून दिले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मबोध आणि परिवर्तनाची शक्ती दडलेली आहे. त्यांच्या जीवनातून समाजाने समतेचा, न्यायाचा आणि सत्याच्या मार्गाचा स्वीकार करावा, हा त्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ आहे. वाल्मीकी ऋषींचे जीवन हे ‘अंधारातून प्रकाशाकडे’ जाण्याचा प्रवास आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आत्मविश्वास आणि नीतिमूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीला अनुसरून मार्गदर्शन मिळते.” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार !* पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपुर्ती *जळगाव प्रतिनिधी दि. 07 ऑक्टोबर – ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय दि. 31.03.1978 व दि. 30.07.1981 नुसार हातपंप /विद्युतपंप देखभाल व दुरुस्ती योजनेची प्रशासकीय यंत्रणा ठरवुन जिल्हा परिषदेला कनिष्ठ अभियंता (यां) , हातपंप यांत्रिकी, विजतंत्री, मदतनीस या सवंर्गातील पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजुर करुन ती भरण्यात येवून त्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेतील देखभाल व दुरुस्ती निधीतुन / ग्रा.प.कडील प्राप्त वसुलीतुन भागविण्यात येत होता. परंतु जिल्हा परिषदेच्या अत्यल्प उत्पन्नातुन सदरील कर्मचा-यांचा वेतन व भत्त्यांचा खर्च भागविण्यास आर्थिक अडचण निर्माण…
*जीपीएस महाविद्यालय पाळधी येथील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश….* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले . या स्पर्धेत GPS च्या खेळाडूंनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि क्रीडाअनुभवाच्या जोरावर उत्तम कामगिरी करत शाळेचा आणि पालकांचा अभिमान उंचावला आहे. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे : 🏅 तेजश्री संदीप खंडारे जिल्हास्तरीय Weightlifting प्रथम क्रमांक 🏅 विकास दिनेश पाटील– 200m running – प्रथम क्रमांक 🏅 भूषण हिम्मत शिंदे– 400m running– प्रथम क्रमांक 🏅 अजय…
जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता रोहन घुगे हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून आज (दि.०७) १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) केल्या आहेत. यामध्ये सध्या जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे पदभार घेणार आहे.
*गावांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास* गारखेडा येथील २८ लक्ष रुपये संरक्षण भिंत चे भूमिपूजन मा.जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या विकास निधीतून गारखेडा तालुका धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत बांधकाम साठी २८ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असून त्या कामाचे भूमिपूजन सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला असून या वेळी उपस्थित मध्ये जिजाबराव पाटील,किशोर पाटील, जगन महाजन, प्रकाश पाटील, कमलाकर पाटील, भास्कर पाटील, बाळकृष्ण पाटील, भानुदास पाटील, वाल्मिक पाटील, विलास महाजन, सोनू महाजन, पवन महाजन, अमोल पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, मंगेश पाटील, विपुल पाटील, दीपक…
*संचालक मंडळ ठरले प्रगतीचे प्रतीक – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ४.५० कोटींच्या विकास कामांनी बाजार समितीचे विकासद्वार खुले ; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण दररोज लिलाव, तात्काळ पेमेंट – आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे *जळगाव/चोपडा, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा): – संचालक मंडळाच्या मनात आलं तर बाजार समितीची नक्की प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्याच्या रक्तमासातून उभी राहिलेली ही संस्था अधिक बळकट व्हायला हवी असे प्रतिपादन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात झाले त्या वेळी ते बोलत होते. *या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !* या विकास…
*शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगावात नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न *जळगाव, दि. ४ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती २०२५ अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील उमेदवार, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) लिपिक टंकलेखक भरती २०२३ मधून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेश वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन…
https://youtu.be/DmLpAw-kuJc?si=EAD35BijZyK2QWt2
📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर मुंबई, दि. १ ऑक्टोबर : राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण निश्चिती/सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश कांकोणकर यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार, अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण ठरविण्याचे काम ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करून जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावयाचा आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना व प्रसिद्धी केली जाणार आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली…