*बांभोरी गावं झाले एकसंघ – गावानं घेतली शिवबंधनाची शपथ !* पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर गावाचा पुन्हा ठाम विश्वास ! *पाळधी/धरणगाव प्रतिनिधी दि. 6 नोव्हेंबर – बांभोरीचं प्रेम मी कधी विसरणार नाही, सहा वेळांपैकी पाच वेळा या गावानं मला भरभरून साथ दिली. आज हेच गाव पुन्हा एकदिलानं शिवसेनेच्या भगव्या छत्राखाली आलं आहे. गावाला सन्मान मिळावा म्हणून पंचायत समिती सभापती व मार्केट कमिटी सभापती पदांचा मान दिला. बांभोरीचा विश्वास कायम राखणं हे माझं कर्तव्यच आहे. असं भावनिक प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. ते बांभोरी येथे झालेल्या भव्य शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रचंड प्रतिसाद अभूतपूर्व गर्दी* मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून व जि प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जिपीएस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज पर्यंत चे शिबिर चे सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली आज या शिबीर मध्ये ८१० रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी २१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात…
*जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक पार* केळी पीकविमा, निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी ठोस चर्चा *मुंबई,/जळगाव प्रतिनिधी दि. 5 नोव्हेंबर – जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि केळी निर्यात क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी आज मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पणन व राजशिष्टाचार जयकुमार रावल तसेच रावेरचे आ.अमोल जावळे यांच्यासह पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग, सहकार व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.* बैठकीत केळी पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे तसेच जिल्ह्यातील केळी निर्यात…
*“डंके की चोट पे ही निवडणूक जिंकणार” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा निर्धार* “कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर हमी *धरणगाव (प्रतिनिधी) दि. 3 नोव्हेंबर – “धरणगाव तालुक्यात गेली पंचवीस वर्षे भगवा झेंडा फडकत आहे. नगरपालिकेवर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. पोटनिवडणुकीतही शिवसेनेचाच विजय झाला. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे.असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. केलेला विकास प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. युती बाबतची जबाबदारी माझ्यावर सोपा. कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवा. ‘डंके की चोट पे ही निवडणूक जिंकणारच !’ असा मी…
*“भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा – पालकमंत्री गुलाबराव पाटील”* *किंवा* *भुसावळ म्हणजे शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन – पालकमंत्री गुलाबराव पाटील”* बुथ मजबूत करा : एकजुटीने काम करण्याचा निर्धार *भुसावळ प्रतिनिधी दि. २ नोहेंबर – भुसावळ शहर व तालुका हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून “भुसावळ फक्त रेल्वे जंक्शन नाही, तर शिवसेनेचा जनादराचे जंक्शन आहे. १९९१ पासून आजपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तीन नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांवर भगवा फडकलेला आहे. पूर्वीप्रमाणेच भुसावळला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हावे. “सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीचा विचार असून , “नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी…
*कुंभार समाज कष्टाळू आणि एकजुटीचा – त्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील* धरणगावात संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ! कुंभार समाजासाठी ३५ लाखांचा निधी – एकजुटीच्या बळावर साकारले भव्य दिव्य सभागृह *धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि. 1 नोहेंबार – “कुंभार समाज हा मेहनती आणि प्रामाणिक समाज आहे. त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. धरणगावमध्ये आतापर्यंत अनेक सामजिक सभागृहे मंजूर केली असून त्यातील हे पहिले सभागृह लोकार्पित होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. समाज बांधवांनी एकजुटीने काम करावे आणि या सभागृहाचा उपयोग समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी करावा.* पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता…
*स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी* *पाळधी* : मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…
पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ रील बनवण्याच्या नादात हर्षल ननवरे आणि प्रशांत खैरनार या दोन तरुण मुलांचा अहमदाबाद एक्सप्रेसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मी तातडीने घटना स्थळ गाठले. ऐन उमेदीच्या वयात आपल्या भागातील दोन मुलांचा असा दुर्दैवी अंत होणे, ही बाब एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मी ननवरे आणि खैरनार कुटुंबाच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. या दुःखद घटनेच्या निमित्ताने, मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि त्यांच्या पालकांना कळकळीची विनंती करू इच्छितो की, सोशल मीडियावरील रील बनवण्याचा मोह जीवापेक्षा मोठा नाही. प्रसिद्धी…
*“मी आधी वारकरी, मग राजकारणी”* – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यां सन्मानपत्र देवुन झाला गौरव ; 500 पेक्षा जास्त कीर्तनकारांची उपस्थिती *पाळधी /जळगाव प्रतिनीधी दि. 25 ऑक्टोंबर – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या भावनिक आणि विनोदी शैलीत सर्व वारकऱ्यांची मने जिंकली. “मी आधी वारकरी आणि मग राजकारणी आहे. कीर्तनकारांची सेवा हीच माझी ऊर्जा आहे. जीवात जीव असेपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणार आहे. जिल्ह्यातील वारकरी व कीर्तनकार समाजासाठी हा मेळावा संघटनात्मक सशक्तीकरणाचा नवा अध्याय असून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच समाधान राजकारणा पलीकडे पात्र आणि गरजू व्यक्तींना मदत करणे हेच माझे धर्मकार्य आहे. प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. कीर्तन हे…
*“संबंधांच्या उजेडात झळकलेले दीप – समाजसेवेतून दिवाळीचा आत्मिक आनंद अनुभवणारे ना. गुलाबराव पाटील”* पालकमंत्र्यांच्या प्रेरणेतून पाळधीत जी.पी.एस. मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या उपस्थितीने “दिपावली स्नेह मिलन सोहळा” उत्साहात पार *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. २२ ऑक्टोंबर – “दिवाळीचा खरा आनंद एकत्र येण्यात आहे. माझे कार्यकर्ते, मित्र आणि गावकरी हेच माझं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या सोबत बसून फराळ करणे म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. राजकारणातले संबंध नव्हे, तर मनाचे नातेच माणसाला श्रीमंत बनवतात. असे भावनिक उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधताना काढले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत बसून फराळाचा आनंद घेतला, जुन्या मित्रांशी…