*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर *पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 एप्रिल -“वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संतांच्या विचारांचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी राजकारण नको. येथे येताना मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदासजी महाराज होते.* पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप* *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी दि. 20 एप्रिल – एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. धरणगाव तालुक्यातील…
*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन* *पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी (दि. १७ एप्रिल) – जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनत चालला असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी, उन्हाशी खेळ करू नका; सावधगिरीच हा सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या… उन्हाळा काही दिवसांचा असतो, पण आपला जीव अमूल्य आहे,” असे भावनिक शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना थेट सतर्क राहण्याचे आवाहन केले.* सध्या उन्हाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्यप्रकाश अत्यंत तीव्र असतो. या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे…
*उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !* जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” सुरु नाही – केवळ १४ विहिरी अधिग्रहित – नागरिकांना दिलासा *जळगाव, दि.17 (जिमाका) : पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना अखंडितपणे सेवा द्यावी,” असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील पाणीटंचाई व महावितरण कडील विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली…
धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव पाळधी/धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा वेगाने छडा लावत पोलिसांनी अल्पावधीत आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रभावी आणि तत्पर कारवाईबद्दल एपीआय कंडारे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यात मयत व्यक्तीचा मृतदेह हा धरणगाव शिवारातील रेल्वे रुळांवर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादी महिला व साक्षीदारांचा शोध घेत…
झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन आज पहिला दिवस धरणगाव/जळगाव, दि. १४ एप्रिल २०२६ — जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील शेतकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या मागणीसाठी झुरखेडा येथे आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भेट दिली व लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत व्याजाची बेकायदेशीर वसुली केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी…
*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील* पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी *पाळधी/पिंप्री प्रतिनिधी दिनांक 14 एप्रिल -“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता यांचे महत्त्व रुजले आहे. बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून, आजच्या तरुणांनी त्यांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हाच खरा बदलाचा मार्ग असून, त्याद्वारेच समाजाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील यांनी केले.* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…
*हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा; प्रत्येक बूथ मजबूत करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट आवाहन* किंवा *मतदार सुरक्षितता हीच प्राथमिकता ; प्रत्येक बूथ भक्कम करण्याचे निर्देश ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/धरणगाव/जळगाव दि. ११ एप्रिल (प्रतिनिधी) – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण हे केवळ एक अभियान नसून ती संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी आहे. “मतदार यादी ही ग्राम पातळीचे राज्य स्तरापर्यंत च्या निवडणुकीची विजयाची शिदोरी आहे. एकही हक्काचा मतदार वंचित राहू नये आणि एकही बनावट नाव शिल्लक राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलएने रणांगणात उतरावे,” असे स्पष्ट आणि ठाम प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…
*“सुरांच्या स्वरगंगेतील एक अजरामर आवाज आज शांत झाला…”* भारताच्या संगीतविश्वाला आपल्या अद्वितीय आणि बहुरंगी आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक कलाकार नाही, तर भारतीय संगीताची एक सजीव परंपरा हरपली आहे. आशाताईंचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा होता. शास्त्रीय, भावगीत, गझल, तसेच चित्रपटसंगीत अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायकीची अमिट छाप उमटवली. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावनांची एक वेगळीच खोली जाणवते, जी पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सुरांनी केवळ मनोरंजनच नाही, तर संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन केले. त्यांच्या कार्यातून…
🚆 पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध उधना ते हसनपूर ही प्रवासी ट्रेन सकाळी ११ वाजल्यापासून पाळधी रेल्वे स्थानकावर थांबलेली होती. रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे तब्बल तीन तासांचा विलंब झाला होता. या अनपेक्षित थांब्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. उन्हाच्या कडाक्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची विशेषतः हालअपेष्टा होत होत्या. स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती. अशा कठीण परिस्थितीत पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव तथा मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ परिस्थितीची दखल घेतली. त्यांनी तातडीने पुढाकार घेत…