Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष, प्रतापराव पाटील यांनी देखील खेळली पारंपारिक पाचपावली पाळधी, ता. धरणगाव – येथील पारंपरिक धार्मिक वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र चावदशीच्या निमित्ताने भवानी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात श्रद्धा, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी काही भक्तगण भवानी मातेचे स्वरूप धारण करून गावभर फेरी काढत भाविकांना दर्शन देतात, ही अनेक वर्षांची परंपरा आहे. यावर्षी पाळधी खुर्द येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने भवानी मातेचे आकर्षक “पार्ट” सादर करण्यात आले. यात तीन लहान भवानी व आठ मोठ्या भवानींचा सहभाग होता. लहान वयातील मुलांनी साकारलेल्या भवानी मातेच्या…

Read More

*हनुमान जयंती हा श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस – पालकमंत्री गुलाबराव पाटील* हनुमान जयंतीनिमित्त एकलग्न व बोरगाव खुर्द येथे २५ लाखांच्या आमदार निधीतून सभा मंडपांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न *पाळधी/धरणगाव/जळगाव प्रतिनिधी | दि. २ एप्रिल (हनुमान जयंती) – हनुमान जयंती हा केवळ सण नसून श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे. मारुती मंदिर ही आपल्या गावांची श्रद्धास्थाने असून त्यांचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी व भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.* धरणगाव तालुक्यात हनुमान जयंतीच्या पवित्र व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख) व…

Read More

*जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च *जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व अनुसूचित जाती (SCP) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा संपूर्ण निधी 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…

Read More

आज दिनांक 30 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात व धरणगाव व जळगाव तालुक्यातील वादळी वारा पाऊस व गारपीट मुळे शेकडो शेतकरी बांधवांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून यात मुख्य पिके गहू , मका, ज्वारी , बाजरी ,केळी व फळबाग या पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी बांधवांचे तोंडाला आलेला गास गेला असून हे सर्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री गुलाबरावजी पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुघे साहेब व स्थानिक तालुका पातळीवर तहसीलदार याना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून उद्या पासून पंचनामे ला सुरुवात होणार असून तरी सर्व शेतकरी बांधवांनी स्थानिक अधिकारी यांच्या शी संपर्क साधावा

Read More

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सेनेकडून सत्कार !* शाळेची वेळ कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत *पाळधी /जळगाव प्रतिनिधी दिनांक२८ – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा आज त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेना (महिला व पुरुष कार्यकारिणी) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळेची वेळ सकाळी ७.०० ते साडेबारा ऐवजी कमी करण्याची मागणी शिक्षक-शिक्षकेतर सेनेने केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांना दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा…

Read More

महावितरणचा भोंगळ कारभार; शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचा गहू जळून खाक पाळधी (ता. धरणगाव) : महावितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्याला बसला आहे. पाळधी येथील पारधी शिवारात गट क्रमांक ३७८ मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी योगेश सतीश पाटील यांचा सुमारे दोन ते अडीच एकरांवरील गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील विद्युत तारा सैल व जीर्ण अवस्थेत असल्यामुळे अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पाळधी शिवारातील शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीमुळे…

Read More

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानीवृत्त अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४.२१ लाखांची मदत *मुंबई/पाळधी/जळगांव प्रतिनिधी दि. 24 मार्च – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानीवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटना, अमरावती यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. हा धनादेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.* राज्यात अलीकडेच आलेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली असल्याचे संघटनेने पत्राद्वारे कळविले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील…

Read More

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे ऑलिम्पियाडमध्ये दैदिप्यमान यश पाळधी (प्रतिनिधी) – पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘सिल्व्हर झोन ऑलिम्पियाड’ या नामांकित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत शाळेतील 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक व सामान्य ज्ञान या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवून विशेष यश संपादन केले असून, अनेक विद्यार्थी Level 2 साठी पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रम दादा पाटील व सचिव श्री प्रताप दादा पाटील यांनी…

Read More

*‘समाधान शिबिर’ ठरतेय जनतेसाठी दिलासादायी उपक्रम – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ८६२ लाभार्थ्यांना कुसुंबा येथे थेट लाभ; ३०० घरकुल प्रलंबित प्रकरणेही मार्गी लागणार *कुसुंबा /जळगाव/पाळधी (प्रतिनिधी) दि. २२ मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे शिबिर स्वराज्याचा विचार जनतेच्या दारी पोहोचवणारे एक जनआंदोलन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शासनाच्या दारात जनतेने फिरू नये, तर सरकारच जनतेपर्यंत पोहोचावे या संकल्पनेतून हे शिबिर राबवले जात असून, जनतेचे समाधान हाच या उपक्रमाचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. कुसुंबा येथे यापूर्वी ३५० कुटुंबांना जागा सह घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित ३०० लाभार्थ्यांचाही जागाच्या उताऱ्यांचा प्रस्ताव मंजूर करून त्यांचा प्रश्न मार्गी…

Read More

*जलसुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचा संकल्प आवश्यक – मंत्री गुलाबराव पाटील* जागतिक जल दिनानिमित्त किनोद येथे पाणीपुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा; ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतरित *जळगाव प्रतिनिधी | दि. २२ मार्च – पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत “पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गावाचा पाणी प्रश्न गावाने सोडवायचा हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. ग्रामपंचायत आणि पाणी समितीच्या माध्यमातून योजना जपणे, टिकवणे आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक जल दिनाच्या औचित्याने तालुक्यातील किनोद येथे जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा…

Read More