Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण *शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”* विकासकामांचा धडाका — रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन *पाळधी / नंदगाव / जळगाव प्रतिनिधी २१ मार्च : – दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने…

Read More

जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे…

Read More

झुरखेडे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ* *पाळधी / धरणगाव, दि. १४ मार्च : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत धरणगाव तालुक्यातील झुरखेडे मंडळातील विठ्ठल मंदिर परिसरात शनिवारी सकाळी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. *यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाने…

Read More

💥*एक हात मदतीचा एक हात मायेचा …* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कार्य बद्दल होत आहे सर्वथरांवर चर्चा*💥 गोरगरिबांची जाण असलेला संवेदनशील नेता मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील रात्री 8 वाजेंच्या दरम्यान पाळधी गावांत फेरफटका मारत असतांना काही गोरगरीब मुले गाव फिरत असतांना दिसले त्यांचा अंगावर परिधान करण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नव्हते मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी लगेच आपली गाडी थांबवून त्यांना जवळ बोलवून त्यांची विचारपूस केली व त्यांच्यात काही मुलाचे वडील वारले असता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना तात्काळ तेवढ्या रात्री राठी कलेक्शन येथून नवीन कपडे घेऊन दिले तसेच आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला त्या मुलांचा घरी…

Read More

💥*एक हात मदतीचा एक हात मायेचा …* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कार्य बद्दल होत आहे सर्वथरांवर चर्चा*💥 गोरगरिबांची जाण असलेला संवेदनशील नेता मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील रात्री 8 वाजेंच्या दरम्यान पाळधी गावांत फेरफटका मारत असतांना काही गोरगरीब मुले गाव फिरत असतांना दिसले त्यांचा अंगावर परिधान करण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नव्हते मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी लगेच आपली गाडी थांबवून त्यांना जवळ बोलवून त्यांची विचारपूस केली व त्यांच्यात काही मुलाचे वडील वारले असता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना तात्काळ तेवढ्या रात्री राठी कलेक्शन येथून नवीन कपडे घेऊन दिले तसेच आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला त्या मुलांचा घरी…

Read More

पाळधी येथे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास नागरीकात भीतीचे वातावरण पाळधी तालुका _ धरणगाव येथे काल रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याची घटना घडली. या मुळे येथे एकच खळबळ गावांत उडाली असून नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील साईबाबा नगरातील रहीवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामा निमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांचे घराला कुलुप होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीचा सुमारास त्यांचे घरचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व तेथील कपाट उघडून त्यात असलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ते आज सकाळी घरी आले…

Read More

*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!* *_​सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा._* ​पाळधी /धरणगाव (प्रतिनिधी): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली शाळेपासून घराच्या १ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. *​काय होता नेमका वाद* राज्य सरकारने यावर्षी आर.टी.ई. नियमांत बदल करून घरापासून शाळेचे अंतर ३ किलोमीटरऐवजी १ किलोमीटर केले होते. तसेच नोंदणीकृत भाडेकराराची सक्ती…

Read More

*नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान *जळगाव दिनांक ८ मार्च : – आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता…

Read More

*महिलांच्या न्यायासाठी ‘भरोसा’चा आधार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे हस्ते ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र इमारतीचे’ भूमिपूजन *जळगाव प्रतिनिधी | दि. ८ मार्च :यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि पीडितांना तातडीची मदत मिळवून देण्यात भरोसा सेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या केंद्रासाठी स्वतंत्र व आधुनिक इमारत उभारल्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज सेवा देणे शक्य होईल. महिलांना न्याय आणि आधार देण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर असून महिलांच्या न्यायासाठी ‘भरोसा’चा नेहमीच आधार राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि संकटात सापडलेल्या महिला-बालकांना तातडीची मदत व समुपदेशन मिळावे…

Read More

*लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* सोनवद येथे ‘छ. शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ : पालकमंत्र्यांच्या हस्ते हजारो शासकीय सेवांचे प्रत्यक्ष वाटप *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. ७ मार्च: शासनाचा खरा अर्थ म्हणजे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय. एखाद्या शेतकऱ्याची जमीनविषयक अडचण दूर झाली, एखाद्या विद्यार्थ्याला आवश्यक दाखला मिळाला किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला, तर त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानच या शिबिराचे खरे यश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या प्रसंगी ते बोलत होते. या महसूल…

Read More