*गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी”; महाराजस्व समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना योजनांचा थेट लाभ *भोकर / आसोदा / जळगाव प्रतिनिधी दिनांक 7 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार ठेवला होता. त्याच विचाराने शासन आज जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे… या आनंदातूनच शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असून, सेवा करण्यासाठीच आपले जीवन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भोकर…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/जळगाव प्रतिनिधी दिनांक 6 मार्च :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ मिळणार असल्याचे मत जळगाव जिल्ह्यचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ती 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्मार्ट शेती आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या शिवाय महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. तो आज पूर्ण केला आहे.…
*जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे* *शामखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न* दिनांक २८/०२/२०२६ सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्था जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा या गावी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन युवा नेर्तृत्व प्रतापभाऊ गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर एल मल्टिपेशालिटी हॉस्पिटल ,जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्र विभाग यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाले जवळपास एकशे पस्तीस पुरुष महिला नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला,या आरोग्य तपासणी ,औषधोपचार ,मार्गदर्शन शिबिरात हृदयरोग( हार्ट )रक्तदाब (बीपी ),मधुमेह( डायबेटिस ), ऑक्सिजन लेव्हल ,जनरल तपासणी ,मोतीबिंदू तपासणी आदि करण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी,शिवसेना शाखा प्रमुख शिबिर आयोजक गणेश भिंगाणे…
*_भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा…!_* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा करण्यात आली. यावेस संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा. प्राचार्य अजिंक्य जोशी व आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळेस प्रा. भूषण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सखोल व तथ्यात्मक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकां कडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत मनोगत व्यक्त करण्यात आले.…
“धरणगावचा जलसंकल्प : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा” *भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तालुक्यातील सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. १ मार्च : धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात.…
*खेळातून संघभावना, संस्कृतीतून संस्कार आणि आत्मविश्वासातून यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप *जळगाव (प्रतिनिधी), दि. २८ फेब्रुवारी – स्पर्धेतून जिद्द निर्माण होते, जिद्दीतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातूनच यश प्राप्त होते. जीवनात खेळ आणि स्वगुणांना खूप महत्त्व असते. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. स्वतःतील गुणांची ओळख करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यास वेळ लागत नाही,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पारितोषिक वितरण…
*खेळातून संघभावना, संस्कृतीतून संस्कार आणि आत्मविश्वासातून यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप *जळगाव (प्रतिनिधी), दि. २८ फेब्रुवारी – स्पर्धेतून जिद्द निर्माण होते, जिद्दीतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातूनच यश प्राप्त होते. जीवनात खेळ आणि स्वगुणांना खूप महत्त्व असते. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. स्वतःतील गुणांची ओळख करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यास वेळ लागत नाही,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पारितोषिक वितरण…
*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का …* धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व माजी सरपंच किशोर प्रताप पाटील यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा संपन्न झाला असून जगन महाजन माळी समाज अध्यक्ष , कमलाकर कांशीराम पाटील, जिजाबराव वामन पाटील, गोटू भिवसन पाटील, बाळकृष्ण प्रताप पाटील , विकास सोसायटी चेअरमन संजय मुरलीधर पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, महेश पाटील यांच्या प्रवेश सोहळा संपन्न झाला असून या वेळी उपस्थित मध्ये मा.सभापती सचिन पवार, तालुका अध्यक्ष दीपक भदाणे…
*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार* एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता *पाळधी / जळगाव | प्रतिनिधी दि. 21 फेब्रुवारी – जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक व महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे उपकार्यालय एरंडोल येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. काल जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२६–२७ अंतर्गत आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी ठामपणे मांडली होती. त्यास अनुसरून एरंडोल येथे उपकार्यालय सुरू करण्यास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मान्यता…
एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण *बोरनार / पाळधी / जळगाव प्रतिनिधी | दि. २१ फेब्रुवारी – ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र आहे. सामाजिक सभागृह व भक्तनिवास या सुविधा म्हणजे गावाच्या संस्कृतीची ओळख आहेत. गावाला मिळालेल्या विकास निधीसोबत गाव एकत्र राहिले तरच खरा विकास होतो. राजकारण येईल-जाईल; पण गावाची एकजूट टिकली पाहिजे. बोरनार गावाने एकोप्याने पुढे जाऊन इतर गावांसाठी आदर्श ठरावे. परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय माणूस मोठा होत नाही. कितीही मोठ्या पदावर गेलो तरी नम्रता, संस्कार आणि देवावर विश्वास…