*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन *जळगाव प्रतिनिधी दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्राण आणि श्वास आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्र्यानी केले. जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.* या…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* 1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया पाळधी (ता. धरणगाव) | मा. ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी गर्दी केली. शिबिरात एकूण 1060 रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 510 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात…
*जळगाव जिल्हा सौर ऊर्जा स्वावलंबनाकडे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बोरगावात ३ मेगावॅट सौर प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पित; ३२१४ शेतकऱ्यांना दिवसा वीज *बोरगाव / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी | दि. १५ फेब्रुवारी – “गावाची शक्ती हीच माझी ताकद आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी वीज, पाणी आणि रस्ते यावरच माझा सर्वाधिक भर आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरण केले जाणार आहे तसेच जांभोरे–विवरे, जामगाव–वाघटुकी, निंभोरा–चोरगाव या शेती रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण सुरू असून ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे. रात्री अंधारात पंप चालवण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत, जळगाव जिल्ह्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबनाकडे नेण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव…
पाळधी बु व खु येथील मेन बाजार पेठ येथील मच्छी व चिकन मार्केट मुळे त्या भटक्या कुत्रांच्या वावर जास्त प्रमाणात झाल्या मुळे बाजारपेठ मध्ये व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातवरण झाले आहे मांसाचे तुकटे त्याच ठिकाणी टाकल्या जात असल्या मुळे भटके कुत्रे हिंसक झाले असून नागरिकांवर हल्ला होत असल्याचे प्रमाण जास्त झाले आहे त्याच रस्त्यांचे जीपीएस स्कुल, मराठी मुलांची शाळा, उर्दु शाळा, कन्या शाला ,स न झंवर विध्यालय असल्यामुळे हजारो विद्यार्थी त्या रस्त्याने जात असतात पाळधी बाजारपेठ हा आजूबाजू परिसरातील सर्वात मोठा बाजरपेठ असल्यामुळे खेडे पाड्यावरील नागरिक पाळधी बाजार करण्यासाठी जास्त प्रमाणात येतात माझे मित्र प्रशांत झंवर यांचा मुलगा कॉलेज…
*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती *पाळधी/धरणगाव प्रतिनिधी | दि. 13 फेब्रुवारी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील…
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश *जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.* दि. २५/११/२०२५ रोजी शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा…
*जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !* ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन *पाळधी/जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील…
*तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे – मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील* पाळधी येथे तरुण उद्योजकांसाठी भव्य मार्गदर्शन मेळावा संपन्न *पाळधी / जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ फेब्रुवारी : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मराठी माणूस हा नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा झाला पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे GPS मित्र परिवाराच्या वतीने भव्य रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे…
*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मंजुरी !* पालकमंत्र्यांकडून चालू आर्थिक वर्षातील ₹८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा घेतला आढावा जळगाव, प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी :- जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सन २०२६–२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ₹७५१ कोटी…
*“विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प”* पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व महिला सक्षमीकरणावर ठोस भर – महाराष्ट्रालाही मोठा लाभ जळगाव प्रतिनिधी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसनशील भारताला विकसित भारताकडे नेणारा दिशादर्शक व संतुलित अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाचे नियोजनबद्ध रूप, उद्योग व उद्योजकतेला प्रोत्साहन, तसेच गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी खंबीर आणि दीर्घकालीन उपाययोजना या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतात. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे रस्ते, रेल्वे, दळणवळण, औद्योगिक वसाहती आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि…