भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे ऑलिम्पियाडमध्ये दैदिप्यमान यश पाळधी (प्रतिनिधी) – पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘सिल्व्हर झोन ऑलिम्पियाड’ या नामांकित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत शाळेतील 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक व सामान्य ज्ञान या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवून विशेष यश संपादन केले असून, अनेक विद्यार्थी Level 2 साठी पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रम दादा पाटील व सचिव श्री प्रताप दादा पाटील यांनी…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*‘समाधान शिबिर’ ठरतेय जनतेसाठी दिलासादायी उपक्रम – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ८६२ लाभार्थ्यांना कुसुंबा येथे थेट लाभ; ३०० घरकुल प्रलंबित प्रकरणेही मार्गी लागणार *कुसुंबा /जळगाव/पाळधी (प्रतिनिधी) दि. २२ मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे शिबिर स्वराज्याचा विचार जनतेच्या दारी पोहोचवणारे एक जनआंदोलन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शासनाच्या दारात जनतेने फिरू नये, तर सरकारच जनतेपर्यंत पोहोचावे या संकल्पनेतून हे शिबिर राबवले जात असून, जनतेचे समाधान हाच या उपक्रमाचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. कुसुंबा येथे यापूर्वी ३५० कुटुंबांना जागा सह घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित ३०० लाभार्थ्यांचाही जागाच्या उताऱ्यांचा प्रस्ताव मंजूर करून त्यांचा प्रश्न मार्गी…
*जलसुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचा संकल्प आवश्यक – मंत्री गुलाबराव पाटील* जागतिक जल दिनानिमित्त किनोद येथे पाणीपुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा; ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतरित *जळगाव प्रतिनिधी | दि. २२ मार्च – पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत “पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गावाचा पाणी प्रश्न गावाने सोडवायचा हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. ग्रामपंचायत आणि पाणी समितीच्या माध्यमातून योजना जपणे, टिकवणे आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक जल दिनाच्या औचित्याने तालुक्यातील किनोद येथे जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा…
नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण *शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”* विकासकामांचा धडाका — रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन *पाळधी / नंदगाव / जळगाव प्रतिनिधी २१ मार्च : – दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने…
जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे…
झुरखेडे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ* *पाळधी / धरणगाव, दि. १४ मार्च : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत धरणगाव तालुक्यातील झुरखेडे मंडळातील विठ्ठल मंदिर परिसरात शनिवारी सकाळी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. *यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाने…
💥*एक हात मदतीचा एक हात मायेचा …* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कार्य बद्दल होत आहे सर्वथरांवर चर्चा*💥 गोरगरिबांची जाण असलेला संवेदनशील नेता मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील रात्री 8 वाजेंच्या दरम्यान पाळधी गावांत फेरफटका मारत असतांना काही गोरगरीब मुले गाव फिरत असतांना दिसले त्यांचा अंगावर परिधान करण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नव्हते मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी लगेच आपली गाडी थांबवून त्यांना जवळ बोलवून त्यांची विचारपूस केली व त्यांच्यात काही मुलाचे वडील वारले असता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना तात्काळ तेवढ्या रात्री राठी कलेक्शन येथून नवीन कपडे घेऊन दिले तसेच आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला त्या मुलांचा घरी…
💥*एक हात मदतीचा एक हात मायेचा …* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कार्य बद्दल होत आहे सर्वथरांवर चर्चा*💥 गोरगरिबांची जाण असलेला संवेदनशील नेता मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील रात्री 8 वाजेंच्या दरम्यान पाळधी गावांत फेरफटका मारत असतांना काही गोरगरीब मुले गाव फिरत असतांना दिसले त्यांचा अंगावर परिधान करण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नव्हते मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी लगेच आपली गाडी थांबवून त्यांना जवळ बोलवून त्यांची विचारपूस केली व त्यांच्यात काही मुलाचे वडील वारले असता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना तात्काळ तेवढ्या रात्री राठी कलेक्शन येथून नवीन कपडे घेऊन दिले तसेच आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला त्या मुलांचा घरी…
पाळधी येथे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास नागरीकात भीतीचे वातावरण पाळधी तालुका _ धरणगाव येथे काल रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याची घटना घडली. या मुळे येथे एकच खळबळ गावांत उडाली असून नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील साईबाबा नगरातील रहीवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामा निमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांचे घराला कुलुप होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीचा सुमारास त्यांचे घरचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व तेथील कपाट उघडून त्यात असलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ते आज सकाळी घरी आले…
*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!* *_सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा._* पाळधी /धरणगाव (प्रतिनिधी): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली शाळेपासून घराच्या १ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. *काय होता नेमका वाद* राज्य सरकारने यावर्षी आर.टी.ई. नियमांत बदल करून घरापासून शाळेचे अंतर ३ किलोमीटरऐवजी १ किलोमीटर केले होते. तसेच नोंदणीकृत भाडेकराराची सक्ती…