भाऊबीजेच्या शुभदिनी चोपड्यात भावबंधाचे सोहळे 🌸 *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणी निर्जलाताई देशमुख व सुशीलाताई गुजर यांच्याकडे जाऊन साजरी केली भाऊबीज* *चोपडा /जळगाव प्रतिनिधी दि. 23 ऑक्टोंबर – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर्षीची भाऊबीज अत्यंत आपुलकीच्या वातावरणात चोपडा येथे आपल्या दोन्ही बहिणी – सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर यांच्या घरी साजरी केली. यावेळी उपस्थित कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भावंडांतील प्रेम, स्नेह आणि आत्मियतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.* या प्रसंगी नगरसेवक आबा देशमुख, राजाराम पाटील, भैय्या पवार, विजय देशमुख, भरत देशमुख तसेच गुजर व देशमुख परिवारातील सदस्य मोठ्या उत्साहात उपस्थित होते. बहिणींनी आरती ओवाळून…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*आई-वडिलांना विसरू नका; तुमच्यामुळे त्यांचं नाव उजळलं पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आई-वडील हेच खरे दैवत; वेळेचा सन्मान करा आणि व्यसनांपासून दूर राहा – व्याख्याते डॉ. विनोद बाबर *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. 19 ऑक्टोबर – “आई – वडिलांना कधीच विसरू नका. मुला-मुलींनी असं नाव कमवा की तुमच्यामुळे आई-वडील ओळखले गेले पाहिजेत.ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल त्यात झोकून द्या. नेहमी आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि संस्कारांचे मूल्य जपा. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं अतूट असतं. गुरुचं आशीर्वाद आणि पालकांचं संस्कार हेच यशाचं खरं रहस्य असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* धरणगाव तालुक्यातील सुमारे 270 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य…
*पाळधी पोलीस इमारत सुरक्षिततेचे मंदिर – पालकमंत्री गुलाबराव पाटील* उत्तर महाराष्ट्रातील पहिले ‘लिफ्टयुक्त’ पोलीस स्टेशन उभे *पाळधी/जळगाव प्रतिनिधी, दि. १८ ऑक्टोबर – पूर्वी कार्यकर्ता म्हणून आंदोलनात पोलिसांशी सामना व्हायचा, आज मंत्री म्हणून त्यांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी मिळतेय, हे माझं भाग्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही आणि पुढेही भासू देणार नाही. ‘पाळधी दूरक्षेत्र’ ही इमारत म्हणजे सुरक्षिततेचे मंदिर आहे. डीपीडीसीमार्फत चार कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करून हे स्वप्न साकार केलं आहे. मी नेहमी सांगतो, जनता आणि पोलिसांमध्ये भीतीचं नाही तर विश्वासाचं नातं असावं. नागरिक पोलीस स्टेशनमध्ये आला, तर त्याला आधार, आदर आणि आत्मविश्वास वाटावा – हाच…
*“एक दिवस आयुष्य प्रसाद हे मुख्य सचिव होतील” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन* *जळगाव प्रतिनीधी दि. १७ ऑक्टोंबर – “सर्वसामान्य जनतेची कामे करणारा आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मावळते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या कार्याचे कौतुक केले. ते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या निरोप समारंभात व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते.* *एक दिवस मुख्य सचिव होतील आयुष्य प्रसाद* पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने सर्व विभागांना सोबत घेऊन, एकसंघपणे काम केले पाहिजे. आयुष्य प्रसाद यांनी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी सर्व…
*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा -जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल ३०० कोटींचे अनुदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील* मुंबई / पाळधी/जळगाव | १८ ऑक्टोबर २०२५ राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा सखोल आढावा घेत शासनाने राज्यातील पाच विभागांतील प्रभावित शेतकऱ्यांसाठी एकूण ३२५८५६.४७ लाख रुपये (३,००० कोटींपेक्षा अधिक) इतक्या मोठ्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला असून, हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) वितरीत केला जाणार आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना…
*“बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *नशिराबाद/ जळगाव प्रतिनीधी दि. 17 ऑक्टोंबर – बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* नशिराबाद येथे महिलांसाठी ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र तयार होणार आहे.…
*शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक – गुलाबराव पाटील* “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार” – व्याख्याते विठ्ठल कांगणे ७५० शिक्षकांचा झाला सन्मान : अडीच तास हसले शिक्षक *पाळधी / जळगाव प्रतिनिधी, दि. १२ ऑक्टोबर: “विद्यार्थ्यांच्या घडविण्यात आई – वडिलांबरोबरच शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. शिक्षक म्हणजे समाजाचा आत्मा असून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे आशीर्वाद असतात, म्हणून मला शिक्षकांविषयी खूप अभिमान आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवणे हे आजचे महत्त्वाचे आव्हान आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनी सांगितले की, जगातला सर्वश्रेष्ठ अनुभव हा गुरुचा…
*वावडद्यात श्री साई ॲग्रो सव्हिर्सेसचे प्रताप पाटील यांच्या हस्ते भव्य उद्घाटन* शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एकाच छताखाली आधुनिक कृषी सुविधा *वावडदा /जळगाव प्रतिनीधी दि. 10 ऑक्टोबर – आज वावडदा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्सेस या आधुनिक कृषी दालनाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले.* या प्रसंगी बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले की, श्री साई ॲग्रो सव्हिर्सेस हे दालन म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकाच छताखाली सर्व कृषी उपाय उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. ठिबक व तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप सह विविध कंपन्यांची रासायनिक खते, बी – बियाणे, कीटकनाशके,…
*वावडदे येथे प्रतापराव पाटील यांची नुकसान झालेले शेतकऱ्यांना भेट* *नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईचे प्रतापराव पाटील यांचे आश्वासन* वावडदे ता .जळगाव दि 10 रोजी वावडदे येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री मा गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ सोनवणे. वावडदे सह परिसरातील अतिदृष्टी झालेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकरी यांचे भरपूर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी व पंचनामा करण्यासाठी प्रतापराव पाटील यांनी सर्कल येवले यांना पाठपुरावा व पचनामासाठी आदेश दिला प्रतापराव पाटील यांनी स्वतः फोन लावून राजपूत मॅडम जिल्हा कृषी अधिकारी तडवी यांना फोन करून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित पाठवा करून…
*पूरग्रस्त बांधवांसाठी जळगाव सीए परिवाराचा मदतीचा हात – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद* *पाळधी/जळगाव प्रतिनीधी दि.10 ऑक्टोंबर – राज्यात विविध भागांत आलेल्या विक्राळ पुरामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली, शेती पाण्याखाली गेली आणि अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या मदतीच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना मदतीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते.* या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ICAI जळगाव शाखेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹51 हजाराचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सादर करण्यात आला. या प्रसंगी ICAI जळगाव शाखेचे चेअरमन CA हितेश आगीवाल, कोषाध्यक्ष CA लक्ष्मीकांत लाहोटी, कार्यकारी…